आमच्यासोबत विश्वासघात झाला, फडणवीसांना 'त्या' गोष्टीचा आजही पश्चाताप

आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय तर आता राजकारणात जिवंत राहिलंच पाहिजे
Devendar Fadanvis
Devendar Fadanvis

मुंबई : राज्यात दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूका पार पडल्या. निवडणूकांनंतर सत्तास्थापनेपर्यंत राज्यात अनेक उलथापालथी सुरु होत्या. यादरम्यान २३ नोव्हेंबर २०१९ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहाटे पहाटे राज्यपालांच्या राजभवनात शपथ घेतल्याची बातमी समोर आली आणि काही मिनिटातच ती संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. या शपथविधीने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंपच झाला होता.

या शपथविधीचा आपल्याला आजही पश्चाताप असल्याची खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मनातील ही खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी आपले पुस्तक येणार असल्याचेही सांगितले, या पुस्तकात सत्तास्थापनेवेळी झालेल्या अनेक घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं असल्याचं त्यांनी सांगितलं

Devendar Fadanvis
मंत्रीमंडळाच्या निर्णयाची होईना अंमलबजावणी : आधिकाऱ्यांवर अजितदादा वैतागले

- आमच्यासोबत विश्वासघात झाला

आम्ही एका वेगळ्या भावनेतून अजित पवारांसोबत आम्ही सरकार तयार केलं होतं. कारण आमच्यासोबत विश्वासघात झाला होता आणि दोन्हीकडून झाला होता. त्या विश्वासघातानंतर वाटलं की, जर आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय तर आता राजकारणात जिवंत राहिलंच पाहिजे, म्हणून आम्ही ते केलं.

- आजही त्या गोष्टीचा मला पश्चाताप होतो

'आजही मला त्या गोष्टीचा पश्चाताप आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर बरं झालं असतं. आपल्यासोबत एवढा मोठा धोका झाला. एवढी बेईमानी झाली. या भावनेतून वाटलं, चला दाखवून देऊ त्यांना, आणि तो शपथविधी झाला. पण आता तो विषय संपला, असे सांगत फडणवीसांनी त्या शपथविधी त्यांना पश्चाताप असल्याची एकप्रकारे कबूलीच दिली.

Devendar Fadanvis
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपला पक्षच संपवला

- महापालिका निवडणूका आम्हीच जिंकणार

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूकांवरही भाष्य केलं.महापालिकांच्या निवडणुकीत भाजपच विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'मला वाटतं की ते स्ट्रटेजिकल अलायन्स करतील, ते एकत्र लढणार नाहीत. जिथे ज्याचा फायदा आहे तो तशी भूमिका घेतो. पण त्यांनी काहीही भूमिका घेतली तरी पण निवडणुका आम्हीच जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- राज ठाकरेंची भेट

गेल्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर आपण आगामी निवडणुकांसाठी मनसेला सोबत घेणार का? असा सवाल केला. या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले. ''एक मित्र म्हणून आम्ही राज ठाकरेंकडे जेवायला गेलो होतो. त्यांच्या नव्या घराबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. अरे बाबा.. राजकीय चर्चा करायला बायकोला थोडी कोण बरोबर घेऊन जातं कोणी. कठीणच काम आहे.' असं म्हणत त्यांनी या प्रश्नाला फार काही उत्तर देणं टाळलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com