गडचिरोली : मी घाबरलो असतो, तर इथे आलोच नसतो. मी कधीच घाबरलेलो नाही म्हणून तर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उध्दवसेनेला टोला लगावला आहे. निमित्त होते नक्षलग्रस्त छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलात कर्तव्यावर असलेल्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचे.
गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात जाऊन मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी तिथे तैनात असलेल्या पोलिस जवानांशी संवाद साधत दिवाळी साजरी केली. (Maharashtra) यावेळी प्रसार माध्यमाशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भिती वाटत नाही, आपण कधीच घाबर नाही, म्हणून तर या पदापर्यंत पोहचल्याचे सांगितले. पालकमंत्री म्हणून आपल या नक्षलग्रस्त भागात यापुर्वी देखील आलो होतो, एका पोलिस स्टेशनचे आज उद्घाटन केले.
त्यानंतर छत्तीसगडच्या जंगलात जिथे नक्षलग्रस्तांच्या कारवायांचा सतत धोका असतो तिथे ड्युटीवर असलेल्या जवानांना भेटण्यासाठी, त्यांच्यासोब दिवाळी साजरी करण्यासाठी आलो आहे. हे जवान रात्रंदिवस आपल्या कुटुंबापासून दूर जीव धोक्यात घालून जनतेचे नक्षलवाद्यांपासून रक्षण करत असतात. सण, उत्सव असतांना देखील त्यांना आपल्या कुटुंबासोबत राहता येत नाही.
अशावेळी आपणच त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करावी, म्हणून मी आलो, असेही शिंदे म्हणाले. गडचिरोली या नक्षलग्रस्त भागाला मुख्य प्रवाहात आणून येथे सर्व प्रकारचा विकास करायचा आहे, असेही शिंदे म्हणाले. मी कधी घाबरलो नाही, म्हणूनच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलो या सूचक विधानातून त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.