Athawale : राज्यातील कायदा व सुव्यवस्था संकटात ; राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य...
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलन करण्याचा केवळ संकल्प केल्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा अतिगंभीर गुन्हा दाखल करणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था संकटात सापडली आहे. (Mumbai) त्यामुळे राष्ट्रपती राजवट लावणे योग्य ठरेल, असेही आठवले म्हणाले.
खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थाना समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिला होता. (Maharashtra) त्यामुळे शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात मातोश्री बाहेर आणि राणा यांच्या घराबाहेर देखील गर्दी केली होती. यातून मोठा वाद निर्माण झाला.
पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक देखील केली. या सगळ्या वादावर आणि राणा दाम्प्त्यावार दाखल झालेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आठवले म्हणाले, महाराष्ट्रात राज्य सरकार विरोधात वक्तव्य करून राज्य सरकारच्या चुका दाखविणे, त्यांच्या चुकीच्या धोरणावर टीका केली की विरोधकांवर कारवाई होऊ लागली आहे. हनुमान चालीसा म्हणण्याचे आंदोलन जाहीर केले म्हणून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदविणे चूक आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्लाची तक्रार लवकर दाखल केली जात नाही. महाराष्ट्रात वाद विवादाचा गोंधळ घातला जात आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थाच संकटात सापडली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे योग्य ठरेल त्यासाठी आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही रामदास आठवले म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.