पुराच्या नुकसानीचा अंदाज केंद्राकडे पाठवा: अमित शहा

maharashtra goa flood send report to center says amit shah
maharashtra goa flood send report to center says amit shah

पणजी :सांगली, कोल्हापुरसह  गोवा राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज चिंता व्यक्त केली. तसेच राज्य सरकारांनी नुकसानीचा तातडीने अंदाज घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, असे शहा यांनी आवाहन केले. 

पश्चिम विभागीय परिषदेच्या २४ व्या बैठकीचे आज येथे शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गोवा, महाराष्ट्र, गुजरात राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासकीय प्रमुख आणि दीव-दमण आणि दादरा-नगर हवेलीचे केंद्र तसेच राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 या वेळी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी जम्मू-काश्मीर राज्यासंबंधी कलम ३७० आणि ३५-अ बाबत घेतलेल्या निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. फडणवीस यांच्या ठरावाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी तसेच दीव-दमण आणि दादरा-नगर हवेलीच्या प्रशासकीय प्रमुखांनी अनुमोदन दिले आणि निर्णयाचे स्वागत केले.
 
आजच्या बैठकीत गेल्यावर्षी गुजरात येथे झालेल्या २३ व्या बैठकीत मांडण्यात आलेले मुद्दे आणि त्यावरील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com