मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी अजोय महेता यांना मिळालेल्या मुदतवाढीत कोरोना संकटाचे सावट लक्षात घेता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र हे सर्वाधिक बाधित राज्यांपैकी एक आहे.मुंबई आणि पुणे या दोन महानगरांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढू नये याची काटेकोर काळजी घेणे आवश्यक आहे.
अजोय महेता हे अत्यंत कुशलतेने महाविकास आघाडीतील तीन पक्षांचा समन्वय साधत शक्य त्या सर्व उपाययोजना अंमलात आणत आहेत.संकटकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नवा अधिकारी नेमण्याऐवजी कुशल प्रशासक अधिकारपदावर असणे आवश्यक आहे.त्यासाठी महेता यांनाच मुदतवाढ मिळणे लाभदायक असेल, असे राज्य सरकारचे मत आहे.
मुदतवाढीसंबंधीचा पत्रव्यवहार कोरोनासंकटाअगोदर करण्यात आला होता.पंतप्रधान कार्यालयही महेता यांच्या कामावर खूष आहेत.राज्याच्या मुख्य सचिवपदावरील व्यक्तीला सतत मुदतवाढ देणे नियमाला धरून नसल्याने आता महेता निवृत्त होणार असे वाटत असतानाच कोरोनामुळे परिस्थिती बदलली असे मानले जाते. या संबंधीचा निरोप लवकरच अधिकृतपणे मिळेल काय या कडे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.