वैभव काळानुसार बदलला, त्याचा निर्णय योग्य : मधुकरराव पिचड

आगामी काळात आपण सर्वांनी त्यांना साथ देऊन विकासाचे दिशेने वाटचाल करावी.
वैभव काळानुसार बदलला, त्याचा निर्णय योग्य : मधुकरराव पिचड

नगर : भारतीय जनता पक्षाला जनतेने स्वीकारले आहे. हा पक्ष विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आपल्या तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काळानुसार बदलत आमदार वैभवने घेतलेला निर्णय योग्य आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव यांनी केले.

पिचड यांच्या उपस्थितीत आज दुपारी अकोले येथे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात आमदार वैभव पिचड यांनी भाजपात जाणार असल्याचे घोषित केले. या वेळी बोलताना मधुकर पिचड म्हणाले, आपल्या तालुक्याचा विकास महत्त्वाचा आहे आणि तो साधायचा असेल, तर विकासाच्या दिशेने चालणाऱ्या पक्षाशी सहमत होणे आवश्यक आहे . भाजप देशपातळीवर उत्कृष्ट काम करत असल्याने काळानुसार बदलत आमदार वैभव यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. आगामी काळात आपण सर्वांनी त्यांना साथ देऊन विकासाचे दिशेने वाटचाल करावी, असे पिचड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com