धनंजय मुंडे यांचा परळीसाठी अट्टाहास का ? - माधव जाधव

मागच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा पराभव झाला. आताच्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे या मतदार संघातून भाजप उमेदवारापेक्षा 18 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. प्रयत्न करुनही परळीतून मतांची आघाडी मिळत नसल्याचे धनंजय मुंडेंना माहित असूनही ते हा मतदार संघ राष्ट्रवादीला मागून घेण्याचा अट्टहास का करतात असा सवाल कॉंग्रेस किसान आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष माधव जाधव यांनी केला आहे.
 धनंजय मुंडे यांचा परळीसाठी अट्टाहास का ? - माधव जाधव

घाटनांदूर (ता. अंबाजोगाई) : मागच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा पराभव झाला. तर, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे परळीतून भाजप उमेदवारापेक्षा 18 हजार मतांनी पिछाडीवर होते. प्रयत्न करुनही मतांची आघाडी मिळत नाही हे स्वत: धनंजय मुंडेंना माहित असूनही परळी मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडून घेण्याचा अट्टाहास ते का करत आहेत ? असा सवाल करत परळीत दगडापेक्षा विट मऊ म्हणून मतदार धनंजय मुंडेंना टाळतात असे कॉंग्रेसच्या किसान आघाडीचे मराठवाडाध्यक्ष माधव जाधव यांनी म्हटले आहे. 

विधानसभा निवडणुकीची दोन्ही कॉंग्रेस पक्षांनी तयारी सुरु केली असून राष्ट्रीय कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडीही निश्‍चित मानली जात आहे. परळी मतदार संघ हा मुंडे भाऊबंदकीमुळे राज्यात गाजतो. मात्र, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीत जिल्ह्यातील सहापैकी परळी हा एकमेव मतदार संघ कॉंग्रेसच्या वाट्याचा आहे. मात्र, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. 

या मतदार संघातून त्यांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला. लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे परळी मतदार संघातून भाजप उमेदवारापेक्षा 18 हजार मतांनी पिछाडीवर होते. धनंजय मुंडेंनी कितीही प्रयत्न केले तरी परळीतून त्यांना मतांची आघाडी मिळु शकत नाही. याची त्यांनाही जाणिव आहे. तरीही परळी विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस ला सोडून घेण्याचा अट्टाहास ते का करत आहेत ? असा सवाल माधव जाधव यांनी केला. 

मुंडे भावंडांमध्ये जाणीवपूर्वक तिसरा पर्याय पुढे येऊ दिला जात नाही. मग मतदार "दगडापेक्षा विट मऊ' असे म्हणून धनंजय मुंडे यांना टाळतात व त्यांच्या भगिनींना म्हणजे भाजपला याचा फायदा होतो. ही गोष्ट धनंजय मुंडे यांनाही माहिती आहे असेही माधव जाधव म्हणाले. हक्काचा परळी मतदारसंघ कॉंग्रेसला सोडल्यास नक्कीच कॉंग्रेसचा विजय होईल. परळीतून भाजपला खरोखर पराभूत करण्याची धनंजय मुंडे यांची प्रामाणिक इच्छा असेल तर परळीची जागा कॉंग्रेसला सोडून धनंजय मुंडे यांनी आघाडीचा धर्म प्रामाणिक निभवला तर भाजपचा नक्कीच पराभव होईल, असा विश्वासही माधव जाधव यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com