राहुलबाबा म्हणाले, "माझं नाव राहुल सावरकर नव्हे तर राहुल गांधी ' !

राहुलबाबा म्हणाले, "माझं नाव राहुल सावरकर नव्हे तर राहुल गांधी ' !

नवी दिल्ली : "माझ नाव राहुल सावरकर नव्हे तर राहुल गांधी आहे' अशी भाषणाला सुरवात करतानाच कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. भारताच्या शत्रूंनी नव्हे तर मोदींनी देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी आज केली. 

दिल्लीतील रामलिला मैदानावर कॉंग्रेसने काढलेल्या भारत बचाव रॅलीत गांधी बोलत होते. यावेळी कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी,माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. मोदी राजवटीतील गेल्या सहा वर्षातील सरकारने घेतलेल्या निर्णयाची त्यांनी चिरफाड केली. 

कॉंग्रेस कधीच कोणाला घाबरली नाही आणि घाबरणार नाही अशी गर्जना करताना देशात आज भितीचे वातावरण आहे हे संपविण्याची गरज आहे असे सांगितले. राहुल गांधी म्हणाले, की गेल्या सहा वर्षात अंबानी आणि अदानी या उद्योगपतींना मोठी कंत्राट दिली आहेत. अदानींना आतापर्यंत पन्नास कंत्राटे देण्यात आली आहेत. ही कंत्राटे एक लाख कोटीहून अधिक रूपयांची आहेत.

देशात आजही प्रामाणिक उद्योगपती आहेत. त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. एकीकडे उद्योगपतींची 60 कोटींची कर्ज माफ केली जात आहेत तर दुसरीकडे शेतकरी, कष्टकरी आणि युवक देशोधडीला लागला आहे. देशात गेल्या 45 वर्षात बेरोजगारी नव्हती ती आज पाहण्यास मिळत आहे. 

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारच्या काळात आपली अर्थव्यवस्था नऊ टक्‍क्‍यांवर होती ती आता 4.5 टक्‍क्‍यांवर आली आहे. देशाच्या दुश्‍मन होते त्यांचे ध्येय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे स्वप्न होते. जे शत्रूंनी केले नाही ते मोदींनी केले आहे. देशाची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचे काम मोदींनी केले आहे असा आरोपही त्यांनी केला.

मोदींनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा होता त्याचेच फळ आज देशाला भोगावे लागत आहे. जो पर्यंत या देशातील शेतकरी, मजुर, तरूणांच्या हातात पैसा खेळणार नाही तोपर्यंत देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असे म्हणता येणार नाही. देशातील काळा पैसा बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्या मोदी सरकारने गरीबांचे पैसे अंबानी आणि अदानींच्या खिशात घातल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com