आमचं ठरलंय, विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचाच :विजय वडेट्टीवार

काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसण्याचा जनादेश मिळाला आहे. सत्ता स्थापन होईपर्यंत मी विरोधी पक्षनेता आहे. पुढील विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा असेल. आमच्यात लहान-मोठा भाऊ असे नाही. आम्ही जुळे भाऊ आहोत. ज्यांचे आमदार जास्त. त्यांचा विरोधी पक्ष नेता. असं आमचं ठरलंय,'' असेही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
Congress Leader Vijay Vadettiwar Visiting Farms in Nagar District
Congress Leader Vijay Vadettiwar Visiting Farms in Nagar District

राहुरी (नगर) :  काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसण्याचा जनादेश मिळाला आहे. सत्ता स्थापन होईपर्यंत मी विरोधी पक्षनेता आहे. पुढील विरोधी पक्षनेता राष्ट्रवादीचा असेल. आमच्यात लहान-मोठा भाऊ असे नाही. आम्ही जुळे भाऊ आहोत. ज्यांचे आमदार जास्त. त्यांचा विरोधी पक्ष नेता. असं आमचं ठरलंय,'' असेही विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राहुरी पंचायत समितीच्या सभागृहात अवकाळी पावसामुळे नुकसानीचा आज आढावा घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार प्राजक्त तनपुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, अमोल जाधव, नंदकुमार गागरे, प्रकाश देठे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे उपस्थित होते.

फक्त शरद पवार वाचवू शकतील
वडेट्टीवार म्हणाले, "डबघाईस आलेला महाराष्ट्र देशात एक नंबर वरून सातव्या क्रमांकावर घसरला आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. या परिस्थितीतून फक्त शरद पवार महाराष्ट्राला वाचवू शकतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवार होणार असतील. तर आंम्हाला सर्वाधिक आनंद होईल."  असे सूचक विधान वडेट्टीवार यांनी केले.

केंद्र सरकारचे राज्याकडे दुर्लक्ष
वडेट्टीवार म्हणाले, "अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र संकटात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक राज्यात पाहणी करण्यासाठी जातात. परंतु, महाराष्ट्रात येत नाहीत. यावरून केंद्र सरकारचे राज्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. अवकाळी पावसामुळे राज्यात ३५ हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हंगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या एनडीआरएफ मधून दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे."

"मागील पाच वर्षात पुरेशी कर्जमाफी झाली नाही. पिक विमा मिळाला नाही. विमा असो वा नसो. शासनातर्फे सोयाबीन, मका, बाजरी पिकाला हेक्‍टरी २५ हजार रुपये मदत मिळाली पाहिजे. कपाशी वेचायला शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही.  जिल्हाधिकारी यांना सरसकट पंचनामा करण्याची सूचना दिली आहे," असे ते म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com