संभाजीराजेंनी एक मंत्री, दोन खासदार व एका आमदाराला गाडीत बसवून सारथ्य केले...

कोल्हापूरच्या विमानतळाच्या प्रश्नासाठी सर्वजण एकत्र आले..
kolhapur airport
kolhapur airport

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानतळाच्या प्रश्‍नांसाठी पालकमंत्री, तीन खासदार, तीन आमदार अशी जंम्बो बैठक झाली. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज सुद्धा येथे उपस्थित होते. पहिल्यांदाच अशी बैठक झाली. विमानतळावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आल्यानंतर सर्वांची धावपळ उडाली. यावेळी कोण कोणाच्या गाडीत बसले हे कळत नव्हते. याचवेळी खासदार संभाजीराजे यांनी थेट गाडीचे स्टेअरींग ताब्यात घेतले आणि कॅन्वॉय बाजूला ठेवूून पालकमंत्री सतेज पाटील आणि खासदार प्रा. संजय मंडलीक, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांना आपल्या गाडीत बसवून त्याचे सारथ्य केले.
 

स्थानिक पातळीवरील अडथळे दूर करण्यासाठी आणि आवश्‍यक सुविधा देण्यासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितल्याची माहिती पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. सल्लागार समितीचे अध्यक्ष आणि खासदार संजय मंडलीक, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धैर्यशील माने, यांच्यासह आमदार प्रकाश आबीटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. स्लाईड शो आणि प्रत्यक्षातील पाहणी अशा दोन्ही पद्धतीने विमानतळ कामाचाही आढावा घेतला.

विमानतळावरील नाईट लॅण्डींगसाठी अडथळ्यांची मालिकांच असल्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाच्या सहकार्याने ते सोडविण्यासाठी आज विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली. यासाठी दिल्लीत जीडीसीए बरोबर पुढील आठवड्यात बैठक घेण्याचा निर्णय झाला.

टर्मिनल्स इमारतीचे काम संथ गतीने सुरू असल्याची खंत सर्वांनीच व्यक्त केली. यावेळी विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्याकडून डिसेंबर अखेर ही इमारत पूर्ण होईल, असे आश्‍वासन दिले. पाहणी वेळीच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी तातडीने काम होणे अपेक्षीत असूनी समन्वयक अधिकारी पाहिजे असे सांगितले. पालकमंत्री पाटील यांनी तातडीने सुचना देवून अतिरिक्त जिल्हाधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली. याचवेळी मुंबईतील इमारतींचे अडथळे नाहीत काय त्याचाही विचार करा असेही महाराजांनी सर्वाना सांगतिले.

कोल्हापूर विमानतळासाठी राजाराम महाराजांचे नाव द्या, अशी मागणी पुढे आली आहे. त्या संदर्भात स्वतः या मुख्य ऑथेरिटीशी चर्चा करणार आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून राजाराम महाराजांच्या हस्ते या विमानतळाचे उद्‌घाटन झाले आहे. हा राजकीय मुद्दा नसून राज्य सरकारने यासाठी ठराव केला आहे. विशेष बाब म्हणून पूर्तता करावी, अशी मागणी करणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नावर सांगितले. तसेच जोपर्यंत मोठी विमानसेवा सुरू होणार नाही तोपर्यंत कार्गो सेवा सुरू होण्यावर मर्यादा असल्याचेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

विमानतळाचा लाभ 2 लाख 13 हजार प्रवासींनी घेतला
1370 मीटर धावपट्टी 2300 मीटर होणार
आणखी 64 एकर जागा आवश्‍यक
64 जागा मोजणीसाठी दहा कोटी जमा
64 एकरात 336 सातबारे आणि 1000 मालक
तामगाव रस्ता विमानतळाच्या बाजूने नेणार
कळंबा पॉवर ग्रील सुद्धा नाईट लॅण्डींगसाठी अडथळा
गडमुडशिंगीतील ट्रान्स्मीशन लाईन स्थलांतराचा प्रस्ताव
ट्रान्सिशन लाईन स्थलांतरासाठी 18 कोटी खर्च

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com