ओबीसी आरक्षण : तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू...शरद पवार

पंधरा दिवसात Fifteen Days निवडणूक Election नाही तर निवडणुकीसाठी लागणारी प्रक्रिया सुरू करा, असा त्याचा अर्थ आहे, असेही शरद पवार Sharad pawar यांनी स्पष्ट केले.
MP Sharad Pawar
MP Sharad Pawarsarkarnama

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने ज्या परिस्थितीत निवडणूक थांबवली तिथून निवडणूका सुरू करा असा निर्णय दिला आहे. राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.

ओबीसी आरक्षणाविना निवडणूका होत असल्याबाबत श्री. पवार यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने ज्या परिस्थितीत निवडणूक थांबवली तिथून निवडणूका सुरू करा असा निर्णय दिला आहे.

MP Sharad Pawar
ती वक्तव्ये विनोदी... अशा वक्तव्यांना लोक गांभीर्याने घेत नाहीत...शरद पवार

अनेक ठिकाणी याद्या तयार झाल्या आहेत. या याद्यांवर काही ठिकाणी हरकती मागविण्यात येतात, त्यानंतर वॉर्ड तयार करण्यात येतो. यानंतर आरक्षणानुसार महिला, दलितांसाठी राखीव वॉर्ड कोणता हे बघितले जाते. अशा सर्व प्रक्रियेसाठी दोन-तीन महिने लागणारच.

MP Sharad Pawar
भाजपने महाराष्ट्रासाठी खोदलेल्या खड्ड्यात संपूर्ण देशातील ओबीसी गेले!

त्यामुळे कोर्टाने निवडणुका जिथे थांबविल्या तिथून निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू करण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे पंधरा दिवसात निवडणूक नाही तर निवडणुकीसाठी लागणारी प्रक्रिया सुरू करा, असा त्याचा अर्थ आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com