नवनीत राणा-रवी राणांबाबत न बोललेलं बरं !

हनुमान चालिसा पठण करण्यासाठी शिवसेनेला आव्हान देत राणा दाम्पत्य अमरावतीहून मुंबईला पोचले.
Jayant Patil
Jayant Patilsarkarnama

कोल्हापूर : खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा या दाम्पत्याबद्दल साऱ्या महाराष्ट्राला चांगली माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, या शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या दोघांवर टीका केली. शिवसेनेला आव्हान देत या दाम्पत्याने मुंबई गाठल्याने आज दिवसभर सोशल मिडीयावर याचीच चर्चा सुरू आहे. त्यावरून राणा दाम्पत्यावर पाटील यांनी सडकून टीका केली.

Jayant Patil
बाप दाखव नाहीतर श्राध्द कर! शरद पवार कडाडले

हनुमान चालिसा पठण करण्यासाठी शिवसेनेला आव्हान देत राणा दाम्पत्य अमरावतीहून मुंबईला पोचले. अमरावतीतील शिवसेनेचे कार्यकर्ते व पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न करूनदेखील हे दोघे मुंबईत पोचले कसे, याचीच चर्चा असताना पाटील यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचे जाहीर करून खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मुंबई गाठली आहे. त्यांना प्रतित्युतर देण्यासाठी मुंबईत शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. या पाश्‍र्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर पाटील यांनी या दोघांवर टीका केली.

Jayant Patil
मोठी बातमी : एलआयसीतील भागीदारी विकून मोदी सरकार होणार मालामाल

राणा यांच्या आव्हानाला युवासेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी प्रतिआव्हान दिले आहे. मुंबईत आलेच तर त्यांना प्रसाद देऊ असे म्हटले आहे. या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर पाटील यांनी अधिक बोलण्याचे टाळले. मात्र, कुणाऱ्या कृतीवर प्रतिक्रया आल्यास त्यात विशेष वाटण्याचे कारण नाही, असे सांगत त्यांनी एक प्रकारे युवासेनेच्या भूमिकेचे समर्थन केले. शिवसेनेने विरोध करूनदेखील राणा दाम्पत्याने मुंबई गाठल्याने तणाव निर्माण झाला असून कोणताही अनुचित प्रकार होऊ, नये यासाठी पोलीस काळजी घेत आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या समारोप संकल्प सभेने उद्या (ता.२३) कोल्हापुरात होणार आहे. राज्यातून तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून कार्यकर्ते या सभेला येणार आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद काय आहे, ते उद्या कळेल, असे पाटील यांनी म्हटले आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी राज्यातील काही नेते शरद पवार यांच्यावर टीका करतात.प्रसिद्धी मिळवायची असेल तर पवारांवर टीका करा, असा जणू ‘ट्रेंड’च गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्रात निर्माण झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com