रिंगणात उतरून निवडणूक लढा; सतेज पाटलांचे विरोधकांना थेट आव्हान 

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीवरुन जिल्ह्यातील राजकारण तापले आहे.
congress leader satej patil says opponents should contest gokul election
congress leader satej patil says opponents should contest gokul election

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणूकीला स्थगिती मिळावी म्हणून सत्तारूढ संचालक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. सत्तारूढ गट पराभवाला घाबरूनच न्यायालयात जात आहे. वास्तविक संचालकांनी न्यायालयात जाण्याऐवजी रणांगणात येवून लढाई लढली पाहिजे. गोकुळ निवडणूकीत पराभव दिसत असल्याने सत्तारूढ संचालकांकडून हे कृत्य केले आहे, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केली. 

गोकूळ निवडणूकीत विरोधकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडी पॅनेलची घोषणा केली. या वेळी पाटील म्हणाले, महाविकास आघाडीमधून राजर्षी शाहू शेतकरी आघाडी म्हणून हे पॅनेल असेल. गेल्या पाच वर्षापासून आम्ही लढा देत आहे. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसही आपल्यासोबत आहे. शिवसेनाही ताकदीने यामध्ये उतरली आहे. त्यामुळे, सत्तारूढ गटाला गोकुळमधील आपली सत्ताच अशीच राहावी असे वाटत आहे. 

कर नाही तर डर कशाला, या प्रमाणे सत्तारूढ गटाने न्यायालयात न जाता थेट मैदानात उतरुन निवडणूक लढवली पाहिजे. सत्तारूढ गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा कशासाठी प्रयत्न करत आहे, असा सवालही पाटील यांनी केला. तसेच, पराभव दिसत असल्यामुळेच ते हा प्रकार करत आहेत. अशी टीकाही त्यांनी केली. 

गोकुळ दूध संघ खेचून घेण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. विशेषतः सतेज पाटील त्यासाठी अधिक आक्रमक आहेत. गोकुळ दूध संघावरील माजी आमदार महादेवराव महाडिकांचे संस्थान खालसा करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यासाठी त्यांनी थेट "मातोश्री'वरून फिल्डिंग लावण्याची मोर्चेबांधणी केली. त्यामुळे गोकुळच्या आखाड्यात या वेळी कॉंग्रेसचे नेते तथा पालकमंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना शिवसेनेची ताकद मिळाली आहे. 

काही दिवसांपूर्वी पाटील म्हणाले होते की, गोकुळ' खऱ्या अर्थाने उत्पादकांच्या मालकीचा व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा आहे. गाय असो किंवा म्हैस दूधाला जास्ती-जास्त दर दिला पाहिजे, यासाठी वारंवार मागणी होत असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतीला पर्यायी म्हणून असणारा दूग्ध व्यवसायही प्रमुख व्यवसाय कसा होईल, याकडे लक्ष दिले जाईल. 

सर्वांना एकत्रित घेवूनच गोकुळ दूध संघाची निवडणूक लढली जाईल. आत्तापर्यंत शेतकरी गोकुळच्या लाभापासून वंचित राहिला आहे. गोकुळ नफ्यातील जास्ती-जास्त वाटा दूध उत्पादक सभासदांना मिळालाच पाहिजे, असा आपला आग्रह आहे. महाविकास आघाडीकडून हेच काम प्रामाणिकपणे केले जाईल, असेही पाटील यांनी आधी स्पष्ट केले होते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com