'आमचं ठरलंय' म्हणत कोल्हापूरकरांनी महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवली !

राजकारणाच्या पॅटर्नमध्ये काल, आज आणि उद्याही जगात भारी कोल्हापूरीच असणार -सतेज पाटील
Kolhapur-battle-Royale
Kolhapur-battle-Royale

मुंबई  :  कला, क्रिडा, संगीत, साहित्य आणि राजकारण असो वा सामाजिक कार्य...एखादी गोष्ट मिळवायची असेल तर काहीही करण्याची तयारी असलेल्या कोल्हापूरकरांनी राज्याच्या राजकारणातही नव्या पॅटर्नला जन्म दिला आहे.

लोकसभा निवडणुकीपासून ते आजपर्यंत सर्वात जास्त चर्चा झालेल्या 'आमचं ठरलंय' आणि 'महाविकास आघाडी' या टॅगलाईनची मूहूर्तमेढ कोल्हापूरच्या लाल मातीत रूजल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्याच्या आजच्या राजकारणात 'जगात भारी आम्ही कोल्हापूरी ' ही  म्हण तंतोतंत लागू पडताना दिसत आहे.

सन 2014 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय महाडीक खासदार म्हणून निवडून आल्यापासून कोल्हापूरच्या राजकारणात वादाला सुरूवात झाली होती. खासदार झाल्यापासून त्यांच्याविरोधात दोन्ही कॉंग्रेसचे नेते त्यांच्या विरोधात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रारी करत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी महाडिक यांना उमेदवारी देण्यास दोन्ही कॉंग्रेसने कडाडून विरोध केला असतानाही पवार यांनी त्यांना पुन्हा संधी दिली. 


त्यामुळे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी कॉंग्रेस आघाडीचा धर्म डावलून उघडपणे महाडिक यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांनी उघडपणे शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्या प्रचारात उडी घेवून त्यांना निवडून आणले. याच निवडणुकीत 'आमचं ठरलंय' या टॅगलाईनचा जन्म झाला होता. 

लोकसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड म्हणून शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी उघडपणे भाजप विरोधात विधानसभा निवडणुकीत भूमिका पार पाडली होती. लोकसभेपासून पुढे विधानभा निवडणुकीपर्यंत जिल्हयात भाजप विरोधी कॉंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काही ठिकाणी शिवसेनेने छुप्या पद्धतीने काम केल्याने भाजपचे कुणीही निवडून आले नाही. म्हणेजच भाजपेतर पक्षांची मोट बांधण्यास कोल्हापूरातून सुरूवात झाली.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपात युती झाल्यानंतर विधानसभेसाठी काही मागण्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात मातोश्रीवर बंद खोलीत चर्चा झाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तिकिटवाटपासून ते सत्तेतील वाटयाच्या मागणीपर्यंत 'आमचं ठरलंय' आणि ठरल्यानुसार होईल, हा शब्द रूढ झाला होता.

उद्धव ठाकरे यांच्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते या शब्दांचा सातत्याने उच्चार करत होते. पुढे विधानसभेच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाच्या भांडणामुळे शिवसेना भाजपासून वेगळी झाली आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची नवीन आघाडी अस्तित्वात आली. 

या आघाडीचे सरकार सत्तेवर येत असून त्यासाठी 'महाविकास' आघाडीचा जन्म झाला. या तिन्ही पक्षांच्या बैठकीत महाविकास आघाडीच्या ठरावाला मंजूरी देण्यात आली. म्हणजेच राज्याच्या राकारणात आमचं ठरलंय आणि महाविकास आघाडी हे शब्द कोल्हापूरकरांनी रूढ केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com