कॉंग्रेसमुळे कोल्हापूरात महापूर : चंद्रकांत पाटील यांचा आरोप 

कॉंग्रेसमुळे कोल्हापूरात महापूर : चंद्रकांत पाटील यांचा आरोप 

पुणे : कोल्हापूरची आंबाबाई अजून आम्हाला पावली नसल्याने कोल्हापूर महापालिकेत भाजपची सत्ता अजून पर्यंत आलेली नाही. आलमट्टी धरणाची वाढलेली ऊंची, 2005 मध्ये निश्‍चीत झालेली नदीची पूर रेषा, या काळात झालेली बांधकामे यावेळी कॉंग्रेसचीच सत्ता होती. त्यामुळे हा महापूर आला, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

पुणे महापालिकेतील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंचगंगा नदीची पूररेषा भाजपने बदलल्याचा आरोप केला जात आहे, त्याबद्दल बोलताना पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, पूर रेषा बदलण्यासाठी आम्हाला आलेल्या प्रस्तावानुसार किमान एक हजार हेक्‍टर जमीनीचा विकास करता येऊ शकतो. नदीची पुररेषेचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल येण्यापूर्वीच ही घटना घडली. भाजपने बिल्डरांच्या हितासाठी पूर रेषा बदललेली नाही.

कोणत्याही धरणात 70 टक्के पाणीसाठा जमा झाल्यावर धरणातून पाणी सोडावे असा कायदा करण्याचा विचार आहे. परत पाऊस पडेल की नाही या विचाराने अभियंते 95 टक्के धरण भरल्यावर पाणी सोडतात. यावेळीही असेच झाले. पण असा कायदा केल्यास पूराचा धोका कमी करता येईल. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज दिला होता, पण तो किती पडणार हे कळत नाही. कोल्हापूरला जो पाऊस आला त्यावेळी चार महिन्याचा पाऊस चार दिवसांत पडला. कोणाच्याही हातात ही स्थिती नव्हती. भविष्यात ही असे होऊ नये यासाठीच नद्यांचा पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी 10 हजार कोटीच्या प्रकल्पा केला जाणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com