किशोर तिवारी यांचा सरकारला घरचा आहेर

कर्जमाफीविषयी फडणवीस सरकारमधील काही मंत्री बेजबाबदार विधाने करीत असल्याचे राज्य सरकारच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीमुळे विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीतीही त्यांनी अहवालात व्यक्त केली आहे.
किशोर तिवारी यांचा सरकारला घरचा आहेर


नागपूर : कर्जमाफीविषयी फडणवीस सरकारमधील काही मंत्री बेजबाबदार विधाने करीत असल्याचे राज्य सरकारच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. सध्याच्या स्थितीमुळे विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीतीही त्यांनी अहवालात व्यक्त केली आहे. 

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापन केली आहे. किशोर तिवारी यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील किशोर तिवारी यांनी 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन केले होते. कॉंग्रेसचे सरकार असताना तिवारी दररोज आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची यादी वर्तमानपत्रांना पुरवित होते. 

भाजपचे सरकार आल्यानंतर तिवारी यांची मिशनच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर तिवारी तसे शांत होते. त्यांची शेतकऱ्यांच्या स्थितीबद्दल इतक्‍यात कोणतेही वक्तव्य आले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. हे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे. यात त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, असा इशाराही दिला आहे. विदर्भातील पीक कर्ज वाटपाला अजूनही गती मिळालेली नाही, कर्जमाफीविषयी मंत्र्यांची बेजबाबदारी विधाने व त्यामुळे शेतऱ्यांनी संभ्रमावस्थेत कर्जाची परतफेड न करणे, बॅंकांची वसुली न होणे या सर्व बाबींचा परिणाम कर्ज वितरणावर झाला असून या स्थितीमुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीती तिवारी यांनी व्यक्त केली आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रात उद्दीष्टांच्या तुलनेत केवळ 14 टक्केच कर्जवाटप झाले आहे. कर्जवितरणाला वेग आणण्यासाठी प्रशासनाने आता कर्जवाटप शिबीराचे आयोजन केले आहे. परंतु त्याला बॅंकांकडून मिळत असलेले असहकार्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असल्याचा अहवाल तिवारी यांनी राज्य सरकारला दिला आहे. या स्थितीला केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार नसून अधिकाऱ्यांनी संवेदनशीलता दाखविणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com