नाशिक : ''केंद्र सरकार शेतकरी आत्महत्या का करतात याचा विचार करत नाही, कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करत आहेत. केलेला खर्च निघत नाही. दुष्काळाचे निकष बदलून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवत आहेत. शेतकरी नव्हे तर रिलायन्स कंपनीच्या हितासाठी राबवत आहे," असा आरोप किसान सभेने केला आहे. त्या निषेधार्थ अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली.
पीकविम्याचा लाभ शेतक-यांपेक्षा विमा कंपन्यांना फायदा होईल. विशेषतः रिलायन्स ला फायदा होईल, अशी व्यवस्था सरकार करीत आहे. अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी काहीही दिले नाही. स्वामिनाथन आयोग शिफारशी, शेतकरी कर्जमुक्ती, पेन्शन बाबत काहीही नाही," असे आरोप करत किसान सभेच्या वतीने देशभर अर्थसंकल्पची होळी करण्यात आली.
शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी आज किसान सभेच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली. शेतकरी, कामगार विरोधी भाजप सरकारला येत्या निवडणुकीत पराभूत करा, असे आवाहन करत आहोत -राजू देसले , राज्य सचिव, किसान सभा, महाराष्ट्र.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.