आता तरी उद्धव ठाकरेंना जाग येईल का : किरीट सोमय्या

गुजरातच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षात एकत्र असूनही सतत भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला चिमटा काढताना भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आता तरी जाग येणार का असा प्रश्न केला आहे.
आता तरी उद्धव ठाकरेंना जाग येईल का : किरीट सोमय्या

मुंबई : गुजरातच्या निकालानंतर सत्ताधारी पक्षात एकत्र असूनही सतत भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेला चिमटा काढताना भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना आता तरी जाग येणार का असा प्रश्न केला आहे.

गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून, भाजपने 100 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेकडून सतत भाजपला लक्ष्य करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच एक्झिट पोलचे आकडे पटले नसल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी राहुल गांधींचे कौतुकही केले होते. किरीट सोमय्या यांनी ट्वीटरद्वारे राहुल गांधींचाही समाचार घेतला आहे. गुजरातच्या जनतेने राहुल गांधींना जबरदस्त उत्तर दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

याच मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले आहे, की गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप पडण्याचे दिवा स्वप्न पाहणारे आमचे मित्र उद्धवजी ठाकरे आणि शिवसेनाला आत्ता तरी जाग येणार का? जमिनीवर येणार, ही देवाला प्रार्थना आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com