देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळाले - सदाभाऊ खोत

 देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळाले - सदाभाऊ खोत

पुणे : मराठा आरक्षणाचे प्रणेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत.त्यांच्यामुळे मराठा समाजातील भावी पिढ्यांचे भविष्य उजळणार आहे."असा विश्वास कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. 

कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रस्थापित नेत्यांनी मराठा समाजातील गरीब माणूस गरीब रहावा म्हणूनच धोरणे आखली. आजवर मराठा समाजाचे जे वाटोळे झाले ते याच प्रस्थापित पुढाऱ्यांमुळे. देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले नसते तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसते.आज जर कॉंग्रेस पक्ष सत्तेत असता तर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसते."असेही खोत म्हणाले. 

"मराठा समाज का देशोधडीला लागला याचा विचार केला तर आजवर जे राज्यकर्ते होते त्यानीच मराठा समाजाला मागे ठेवले. मराठा समाज गरीब रहावा. तो गुलाम रहावा अशी व्यवस्था आजवरच्या प्रस्थापित राजकीय मंडळींनी केली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे कधीही कॉंग्रेस राष्ट्रवादी ला वाटले नाही."असे खोत म्हणाले. "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे. तेच मराठा आरक्षणाचे प्रणेते आहेत."असे खोत म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com