पूरग्रस्तांसाठी जाहीर मदतीपेक्षा दुप्पट मदतीची गरज : विश्‍वजीत कदम

पूरग्रस्तांसाठी जाहीर मदतीपेक्षा दुप्पट मदतीची गरज : विश्‍वजीत कदम

पुणे : पुरामुळे सांगली शहर व जिल्ह्यातील कडेगाव-पलूस तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मोठे नुकसान झाले असून राज्य सरकारने जाहीर केलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्‍कम पुनर्वसनासाठी लागेल. राज्य सरकारने ती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कॉंग्रेसचे नेते, आमदार विश्‍वजीत कदम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. 

कदम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पलूस-कडेगाव मतदारसंघातील पुरग्रस्त भागाची विदारक स्थितीची माहिती, छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून दिली. पुनर्वसनासाठी कदम यांनी तयार केलेला आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर केला. पुनर्वसनाबरोबरच त्वरित कर्जमाफी व्हावी, शेतमजूर तसेच व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे, ज्यांच्या पशुधनाची वा राहत्या घराची हानी झाली आहे अशांना मदत मिळावी, शाळांची तातडीने दुरुस्ती केली जावी व शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच पाठयपुस्तके मोफत मिळावीत आदी 15 प्रमुख मागण्या कदम यांनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्या. 

मदत व पुनर्वसनाच्या कामाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकता दाखविली असून संपूर्ण सहकार्याचे अश्‍वासन दिल्याचे कदम यांनी सांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. या घडीला संपूर्ण सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकाऱ्यांना राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे, असे कदम यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com