" धनुष्यबाणा' मुळेच झारखंडमध्येही भाजपाची सत्ता गेली

" धनुष्यबाणा' मुळेच झारखंडमध्येही भाजपाची सत्ता गेली

पुणे : झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा, कॉंग्रेस व जनता दलाच्या आघाडीने भारतीय जनता पार्टीकडून सत्ता हस्तगत केली आहे. विशेष म्हणजे झारखंडमध्येही धुनष्यबाणामुळेच भाजपाचा पराभव झाला आहे. सकाळी सुरू झालेली मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. 81 जागांपैकी दुपारी चार वाजेपर्यंत भाजपा 25 तर कॉंग्रेस आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. 

झारखंड मुक्ती मोर्चाचे निवडणुकीतील चिन्ह धनुष्यबाण होते. त्यामुळे महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही धुनष्यबाणामुळे भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने आघाडी करून सरकार स्थापन केल्याने भाजपाला सत्तेत येण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. निवडणूक प्रचाराच्या काळातच झारखंडमध्ये भाजपाविरोधी वातावरण असल्याचे सांगण्यात येत होते. यात कॉंग्रेस व जनता दलाबरोबरच झारखंड मुक्ती मोर्चाचा मोठा वाटा आहे. आघाडीचे नेते म्हणून झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांची निवड होणार असून तेच मुख्यमंत्री होण्याची शक्‍यता आहे. जनता दलाच्यावतीने तेजस्वी यादव यांनी सोरेन हेच मुख्यमंत्री होतील, असे सांगितले आहे. कॉंग्रेसनेही सोरेन यांच्या नावाला पसंती दिली असल्याने सोरेन मुख्यमंत्री होण्यात कोणतीच अडचण दिसत नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com