हा डोक्‍यावर पडलाय का असे जितेंद्र आव्हाड कुणाला म्हणाले ? ...

हा डोक्‍यावर पडलाय का असे जितेंद्र आव्हाड कुणाला म्हणाले ? ...

पुणे : हा डोक्‍यावर पडला काय, तो काय बोलतो त्याचे त्याला कळते की नाही माहित नाही अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी शरद पोंक्षे यांच्यावर केली आहे.अस्पृश्‍यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्‍टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. असा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसमोर बोलताना केला होता. यावेळी त्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेचे तत्व पोकळ आहे असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. 

" आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत ते प्रवाहाविरोधात लढले. मात्र अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मण विरोधात उभे राहतात. समाजातील जातीची भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यथित करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्र पुरुषांपेक्षा सावरकर काकणभर श्रेष्ठ आहेत असा दावा पोंक्षे यांनी केला होता. 

या पार्श्वभूमीवर पोंक्षे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की आपण काय बोलतो, कुणाविषयी बोलतो, हे समजलं पाहिजे असे म्हणत आव्हाड यांनी पोंक्षे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला . 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरिचटणीस अमोल मिटकरी यांनीही शरद पोंक्षे यांच्यावर जोरदार टीका केली आहे . त्यांना मेंदू नीट रहावा यासाठी औंषधे नीट घेत जावा असा सल्लाही दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com