गडचिरोली : चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्याची दारू बंदी उठविण्यासाठी जीवाचे रान करणारे मंत्री विजय वडेट्टीवार यांना महाराष्ट्राचे दारू प्रचार मंत्री बनवावे, यामुळे सरकारची तिजोरी भरून ओसंडून वाहील, अशी उपरोधक मागणी स्वामिनी दारूबंदी आंदोलनाचे नेते महेश पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सरसकट दारूबंदी व्हावी या करिता स्वामींनी संघटनेनीअनेक आंदोलने केली आहेत ;त्यांच्या या आंदोलनाला गेल्या काही वर्षात महिलांकडून उस्फुर्त प्रतिसादही मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाल्यानंतर तिथे अवैद्य दारू मोठ्या प्रमाणात मिळत आहे, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपुर यांनी २७ ऑगस्ट ला एका पत्राद्वारे दिलीप वळसे-पाटील राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांना लिहून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याची दारू बंदी उठवा अशी विनंती केलेली आहे.
जर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध दारू मिळत असेल तर या जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवार काय करत आहेत? याचा अर्थ पालकमंत्री हे निष्क्रिय आहेत, त्यांचा प्रशासनावर कोणताही वचक नाही, हे स्पष्ट होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजय वडेट्टीवार यांचे पालक मंत्री पदाबाबत विचार करावा, असे आवाहन महेश पवार यांनी केले आहे.
''दारूबंदी उठविण्यासाठी जीवचा आटा पीटा विजय वडेट्टीवार करीत आहे. मात्र ते हे विसरले की आपण महात्मा गांधी यांच्या विचारांना मानणाऱ्यापक्षात आहोत. गांधी म्हणायचे "मला एक दिवसाचा हुकूमशहा केले, तर मी सर्व प्रथम दारू बंद करेन. आणि हे म्हणतात मी मंत्री झालो तर दारूबंदी उठवीन. गांधीजींचे विचार या पक्षातून संपलेले आहेत असे वाटते,'' असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे .
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.