जे फुटून भाजपकडे जातील त्यांना सर्वजण मिळून पाडू  : जयंत पाटील  

jayant_patil
jayant_patil

मुंबई : भाजप - शिवसेना युतीतला विसंवाद कायम असताना इतर पक्षातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे.

मात्र, अशाप्रकारे जे आमदार स्वपक्षातून फुटून भाजपकडे जातील त्यांच्या विरोधात सर्व पक्ष मिळून एकच उमेदवार उभा करू व त्या फुटीर आमदारांना पाडू. असा इशाराच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे.

शिवसेनेचे काही आमदार फुटले तरी कॉंग्रेस राष्ट्रवादी त्या त्या मतदारसंघात फुटीराला शिवसेनेच्या उमेदवाराला पोटनिवडणूकी मदत करू. असेही जयंत पाटील म्हणाले.

भारतीय जनता पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी अपेक्षित बहुमत नाही. सर्व अपक्ष व इतर घटक पक्षाचे सर्व आमदारांनी भाजपला समर्थन दिले तरीही 125 पेक्षा अधिक संख्याबळ होत नाही. त्यामुळे, सत्ता स्थापन करायची असेल तर कॉंग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेतील काही आमदारांना गळाला लावण्याची खेळी होवू शकते असे मानले जाते. 

या आमदारांना राजीनामा द्‌यायला लावून पुन्हा पोटनिवडणूकीत त्यांना उभे करून विजयी करण्याची खेळी भाजप करेल असे अंदाजही वर्तवले जात आहेत. मात्र, अशा दलबदलू आमदारांना जनतेनं या निवडणूकीत पराभूत केल्याचा दाखला देत जयंत पाटील म्हणाले की, आता जो फुटेल ते पडणारच.

मागील पाच वर्षात भाजपने विरोधी पक्षातील अनेक आमदारांना फोडले. हा सगळा प्रकार भाजपच्या राजकीय व्यभिचाराचा असल्याची टीका करत, अशा खेळीला आता राज्यातली जनता माफ करणार नाही. असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com