भाजपचे आमदार संपर्कात;जयंत पाटलांचा दावा किती खरा ? 

 भाजपचे आमदार संपर्कात;जयंत पाटलांचा दावा किती खरा ? 

पुणे : भाजपकडून निवडून आलेले 15 ते 20 आमदार आपल्या संपर्कात असल्याचे गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात केला. भाजपा-शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून परस्परांवर दबावाचे राजकारण सुरू असून पाटील यांनी आज केलेला दावा या दबावाचाच भाग आहे की काय याची चर्चा सुरू झाली आहे. 

शिवसेना-राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांच्यातील चर्चेचे गुऱ्हाळ गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. भाजपाकडून काही आमदार फोडले जाण्याची शक्‍यता गृहीत धरून कॉंग्रेस व शिवसेनेने सुमारे दहा ते बारा दिवस आमदारांना एकत्र ठेवले होते. शिवसेनेचे आमदार मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये तर कॉंग्रेसचे आमदार थेट राजस्थानमध्ये ठेवण्यात आले होते. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे त्यांना आपल्या मतदारसंघात आणि घरी जाण्याची संधी मिळाली. 

या पार्श्‍वभूमीवर भाजपवर एक प्रकारचा दबाव आणण्याच्या योजनेचा भाग म्हणून पाटील यांच्याकडून दावा केला जात आहे की खरोखरच त्यांच्या संपर्कात भाजपाचे आमदार आहेत याची चर्चा सुरू झाली आहे. संपर्कात असलेल्या आमदारांमध्ये अपक्ष तसेच मूळचे राष्ट्रवादीचे मात्र, विधानसभा भाजपकडून लढलेल्या आमदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाटील यांनी केलेला दावा हा केवळ राजकीय स्टंटबाजीचा भाग असून त्यांनाच त्यांचे आमदार फुटण्याची भीती आहे. भाजपचे आमदार अशाप्रकारे फुटत नसतात, याचे भान पाटील यांनी ठेवावे, असे भाजपाच्यावतीने सांगण्यात येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com