निवडणुकीपुर्वी अनेकदा 'आमचं ठरलंय'ची डायलॉगबाजी झाली!

निवडणुकीपुर्वी अनेकदा 'आमचं ठरलंय'ची डायलॉगबाजी झाली!

कऱ्हाड (सातारा) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूकीपूर्वी अनेकदा 'आमचं ठरलंय' असे सांगितलं आहे. त्यामुळे 'आमचं ठरलंय'ची डायलॉगबाजी खरी केली तर राज्यात राष्‍ट्रपती राजवट लागू होण्याची गरज नाही, असे मत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

दरम्यान, काही आमदारांना अमिषे दाखवायला सुरवात झाली आहे. मात्र कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तर अन्य सर्व पक्ष एकत्र येवून त्याला पराभूत करतील असा पुनरूच्चार करून राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटणार नसल्याचा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. जेष्ठ नेते (कै.) यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव कार्यक्रमासाठी आमदार पाटील येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

भाजप सर्वांत मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याची जबाबदारी भाजपचीच असल्याचे सांगून ते म्हणाले, भाजपचा नकार आल्यावर पुढचे पर्याय विचारात घेता येतात. राज्यपालांनीही अद्याप भाजपला बोलावलेले दिसत नाही. त्यामुळे भाजप व शिवसेनेचे नेमके काय ठरतंय त्यावर पुढचे अवलंबून आहे. 

आमदारांच्या फोडाफोडीसंदर्भातील नप्रश्‍नावर ते म्हणाले, काही आमदारांना अमिषे दाखवायला सुरवात झाली आहे. मात्र कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तरी अन्य सर्व पक्ष एकत्र येवून त्याला पराभूत करतील. राष्ट्रवादीचा एकही आमदार फोडाफोडीमध्ये असू शकत नाही. फुटाफुटी होती ती अगोदरच झाली आहे. त्यामुळे उत्साहाने निवडून आलेले नवे चेहरे आहेत. लोकांच्या विश्‍वासास पात्र ठरणारे निवडून आलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षात बसण्याची त्यांची मानसिकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com