मुख्यमंत्री किती घाबरले आहेत यावर एकत्र निवडणुकीचे ठरेल : जयंत पाटील

devendra_and_jayant_patil
devendra_and_jayant_patil

सातारा :" लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होतील की स्वतंत्र  होतील हे  मुख्यमंत्री किती घाबरले आहेत यावर ठरणार आहे. मोदींच्या आडोशाला बसून आपण जिंकू शकतो का हे पाहूनच ते  निर्णय घेतील", अशी टीका राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील हे आजारी असून त्यांना  पाहण्यासाठी ते आज साताऱ्यात आले होते.त्यानंतर त्यांनी जिल्हा बँकेत पत्रकारांशी संवाद साधला. 

लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र होतील, की वेगवेगळ्या होतील या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, "दोन्ही निवडणूका वेगवेगळ्या होतील, पण मुख्यमंत्री किती घाबरलेत, यावर सर्व अवलंबून आहे. नरेंद्र मोदी यांच्या आडोशाला बसून आपण जिंकू शकतो का याचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री किती घाबरतात यावर सर्व अवलंबून आहे. "
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com