जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांची एकमेकांवर स्तुतिसुमने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे दोन नेते प्रथमच इस्लामपूर येथील जैन धर्माच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एकत्र आले. दोघांनीही या कार्यक्रमात एकमेकांवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला.
जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांची एकमेकांवर स्तुतिसुमने

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हे दोन नेते प्रथमच इस्लामपूर येथील जैन धर्माच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज एकत्र आले. दोघांनीही या कार्यक्रमात एकमेकांवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला. 

व्यासपीठावर जैनधर्मियांचे श्री १००८ चंद्रप्रभूसागर महाराज, काँग्रेस पक्षाच्या राज्य सरचिटणीस अँड.मनीषा रोटे,जैन मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष विजय राजमाने होते.

इस्लामपूर येथील अहिंसा उद्यान, चारुकिर्ती भवन व चंद्रप्रभू मंदीर येथे बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे उदघाटन चंद्रप्रभू सागर महाराज, आमदार पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आ. पाटील यांचे भाषण संपता-संपता खा. शेट्टी यांचे आगमन झाले. यावेळी जयंत पाटील मिश्कीलपणे म्हणाले, की खासदारसाहेब मी आलो तेव्हा एवढ्या जोरात वाद्ये वाजली नाहीत; मात्र तुम्ही आल्यावर जोरात ती वाजली आहेत. त्याचे कारण आधी लोकसभा व नंतर विधानसभा आहे, हे असावे. यावेळी एकच हशा झाला. त्यांनी खा.शेट्टी यांचा लोकप्रिय खासदार असाही उल्लेख केला. 

राजू शेट्टी म्हणाले, की मी ठिकठिकाणच्या समाजाच्या कार्यक्रमांना जातो. मात्र येथील समाजबांधव मला बोलवायला घाबरायचे. आज बोलाविले आहे म्हणजे तुम्ही (आ.पाटील) परवानगी दिली आहे. येथील विकास कामात आपला निधी आहे. माझा काहीही वाटा नाही. तरीही मला बोलविण्याचा मनाचा मोठेपणा आपण दाखविला आहे. येथील विकास कामांना जयंतराव पाटील यांनी कधी निधी कमी पडू दिला नाही आणि कमी पडू देणारही नाहीत. मात्र मलाही सांगा. मीही निधी देईन. आम्ही कोणाचे वाईट चिंतले नाही. आम्ही साखर कारखान्यांकडे ऊस दर मागितला. मात्र कारखाने मोडून टाका, असे कधी म्हणालो नाही. कारण कारखाने मोडून पडले,तर पुढच्या वर्षी ऊस कुठे घालणार? सत्याचा आग्रह धरणे हा आमचा स्वभाव आहे,तो आम्ही कायम ठेवू." 

चंद्रप्रभसागर महाराज यांनीही दोन्ही नेत्यांचे कौतूक केले. ते म्हणाले, की एक बुद्धीचा राजा आहे,तर दुसरा कर्तृत्वाचा राजा आहे. या ठिकाणी देणारे साखर कारखानदार, मागणारे संघटनावाले,तर घेणारे शेतकरी एकत्र आले आहेत. या घटनेचा तुमच्या परिसरावर निश्चितपणे चांगला परिणाम होईल.

राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर. पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, बबन थोटे, युवकाध्यक्ष संग्राम पाटील,स्वाभिमानीचे सयाजी मोरे, अँड. समशुद्दीन संदे, भागवत जाधव,एल. एन. शहा, जिल्हा सत्र न्यायाधीश कल्पना होरे, विजय राजमाने, शीतल पत्रावळे,सचिव समीर करांडे उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com