मी कोण आहे, हे राज ठाकरेंना माहित नाही - इम्तियाज जलील

 मी कोण आहे, हे राज ठाकरेंना माहित नाही - इम्तियाज जलील

औरंगाबाद : " मुस्लिम आणि हिंदूमध्ये कायम तणाव राहावा, म्हणून इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यात आले' हा राज ठाकरे यांचा आरोप खरा असला तरी, त्यांनी आधी मी कोण आहे, याची माहिती करून घ्यायला हवी होती. हरकत नाही, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. पण आता पाच वर्ष मीच औरंगाबादचा खासदार असणार आहे हे राज ठाकरेंनी समजून घ्यावे असा टोला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना लगावला. 

मुंबईतील मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाबद्दल बोलतांना, औरंगाबादेत हिंदू-मुस्लिम तणाव कायम राहावा म्हणून इम्तियाज जलील यांना शिवसेना-भाजपनेच निवडून आणल्याचा खळबळजनक आरोप केला. यावर सरकारनामाशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, राज ठाकरे नेहमी बोलत असतात, त्यांना तो अधिकार आहे. पण माझ्या बाबतीत बोलतांना आधी त्यांनी मी कोण आहे, याची माहिती करून घ्यायला हवी होती. माझ्याबद्दल त्यांना फारशी माहिती नसल्यामुळे ते कदाचित असे बोलले असतील. 

हिंदू-मुसलमानांमध्ये तणाव राहावा असे प्रयत्न या शहरात सत्ताधाऱ्यांकडून कायम केले गेले हे खरे आहे. पण हेच शहरातील जातीय वातावरण नाहीसे करण्यासाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो होतो. जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देऊन लोकांनी शहराच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी बदल घडवावा असे आवाहनच मी सर्वजाती-धर्माच्या मतदारांना केले होते. मतदारांनी देखील माझ्या या आवाहनाला प्रतिसाद दिला आणि मला निवडून दिले. राज ठाकरे यांनी काहीही आरोप केले असले तरी पुढील पाच वर्ष आता मीच या जिल्ह्याचा खासदार असणार आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे असे प्रत्युत्तर इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना दिले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com