महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पोरकेपणाची भावना - इम्तियाज जलील

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पोरकेपणाची भावना - इम्तियाज जलील

औरंगाबाद : महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला. अशावेळी राज्यात सरकार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे पाहायला कुणालाच वेळ नाही. राज्यात सत्ता कुणाची येणार याच्याशी शेतकऱ्यांना काही देणेघेणे नाही, त्यांना तात्काळ मदत मिळायला हवी. सत्ताधारी पक्षाने देखील हेक्‍टरी पंचवीस हजार रुपये मिळावी अशी मागणी केली होती, प्रत्यक्षात मात्र 8 हजार रुपये एवढी तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे. लोक आपल्याकडे आशेने पाहत आहेत, त्यांना न्याय द्या अशी मागणी एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत केली. 

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी इम्तियाज जलील यांनी सभागृहाचे लक्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे वेधले. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू असल्याने शेतकऱ्यांना हेक्‍टरी आठ हजार एवढी मदत राज्यपालांनी जाहीर केली. पण ती पुरेशी नसल्याचे सांगत इम्तियाज जलील म्हणाले, राज्यातील 48 हजार पैकी 46 हजार हेक्‍टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. राज्यात सध्या सरकार अस्तित्वात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे. 

राज्यानंतर शेतकरी आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत, कारण आपल्याकडे अधिकार आहेत, तुम्ही राज्यपालांना आणि संबंधित यंत्रणेला आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना देऊ शकता. देशातील मोठ्या उद्योगपतींचे लाखो, करोडो रुपयांचे कर्ज सरकारने माफ केले आहे, मग शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार का कचरत आहेत? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com