वर्षानुवर्षे रस्त्याला पुरेसा निधी नसल्यानेच खड्‌डे : चंद्रकांत पाटील 

महामार्ग, शहरी व ग्रामीण रस्त्याकडे वर्षानुवर्षे लक्ष दिले नाही, त्याला पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे कमी पैशात कामे झाल्याने रस्त्यावरच्या खड्डयाची समस्या निर्माण होत आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केले.
वर्षानुवर्षे रस्त्याला पुरेसा निधी नसल्यानेच खड्‌डे : चंद्रकांत पाटील 

जळगाव : महामार्ग, शहरी व ग्रामीण रस्त्याकडे वर्षानुवर्षे लक्ष दिले नाही, त्याला पुरेसा निधीही उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे कमी पैशात कामे झाल्याने रस्त्यावरच्या खड्डयाची समस्या निर्माण होत आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे व्यक्त केले.
 
जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की आपल्याला कोणत्याही सरकारवर टिका करायची नाही, परंतु महाराष्ट्रात वर्षानुवर्षे रस्त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यामुळे कमी पैशात हे रस्ते तयार झाले. त्यामुळे ते चांगले झाले नाहीत. या शिवाय या रस्त्यावर हेवी वजनाचीही ट्रॅफिक वाढली, मालवाहतूक ट्रक वाढले. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. 

मात्र आता या रस्त्यासाठी हक्‍काचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. 1लाख हजार कोटी रूपये रस्त्यासाठी उपलब्ध करण्यात येत असून त्यातून राज्यातील 22 हजार किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात येत आहे.विशेष म्हणजे या निधीतून तयार होणारे रस्ते बारा वर्षे खराब होणार नाहीत. जर हे रस्ते खराब झाले तर त्याची संपूर्ण जबाबदारी मक्तेदाराची असणार आहे. या शिवाय मुख्यमंत्री सडक योजनेतअंतर्गतही आता ग्रामीण भागातील रस्तेही चांगले आणि मजबूत होतील, असेही त्यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com