अकोले : राज्यात आज कोरोना बाधितांचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनापासून आपले गाव, आपले शहर, आपले राज्य, आपला देश मुक्त करायचा असेल, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडणे गरजेचे आहे. हा कोरोना एकट्या दुकट्याचे काम नाही. सर्वांनी प्रशासनाला पुरेपूर साथ द्या, असे आवाहन करीत पुत्रप्राप्तीचा फॉर्म्युला सांगितल्यानंतर अडचणीत सापडलेल्या प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) आता राम कृष्ण हरी म्हणत करोनासंदर्भातील लढाईत सक्रीय झाले आहेत.
‘आपलं गाव, आपलं शहर आणि आपला देश’ कोरोनामुक्त करायचा असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
इंदोरीकर महाराजांनी एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘गाव, शहर आणि देश जर करोनामुक्त करायचा असेल, तर प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पार पाडावी. हा कोणा एकट्या-दुकट्याचे काम नाही. निव्वळ शासन, प्रशासनाचा नव्हे, तर आपणा सर्वांचा लढा आहे. त्यामुळे सर्वांनीच सतर्क होत, खबरदारी घेण्याची गरज आहे. शासनाच्या सर्व सूचनांचं काटेकोर पालन करा. आपण आणि आपलं कुटुंब करोना विषाणूपासून दूर ठेवा. घराबाहेर पडू नका. प्रवास टाळा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. मी पण घरीच बसून आहे. तुम्ही पण बाहेर पडू नका' असे महाराजांनी सांगितले आहे.
इंदोरीकर महाराजांनी ३१ मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांच्या सर्व दिवसांच्या तारखा नोंदणी झालेल्या होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे कार्यक्रम रद्द झाले आहेत, असे महाराजांच्या वतीने सांगण्यात आले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.