शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं "शिव संपर्क अभियान" सुरू केलं आहे.
शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात वांद्रे येथील सभेने करण्यात आली. राज्यात हिंदुत्वावरून सुरू असलेले राजकारण आणि त्यात विरोधकांनी शिवसेनेची केलेली कोंडी, भाजप-मनसेच्या राजकीय खेळ, यांमुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे.
पक्षाच्या खासदारांच्या आणि पक्ष प्रवक्त्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले होते. यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होणार आहेत. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेने शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे.
मोठ्या महानगर पालिकांमध्ये मुंबई महानगर पालिकेचाही समावेश केला जातो. गेल्या तीन दशकांपासून मुंबईत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. मात्र भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर आता शिवसेनेला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली.
तर दूसरीकडे भाजपही आक्रमक झाली आहे. भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान राबवले जात असल्याचे बोलले जात आहे.
"आम्ही हिंदुत्वाचे अनुयायी आहोत, आम्ही द्वेष पसरवत नाहीत तर मोठ्या संख्येने लोकांना रोजगार देतो. आम्ही मुंबईत मेट्रो, कोस्टल रोड आणि ट्रान्सहार्बर लिंक रोड बनवला आहे.
बृहन्मुंबई महापालिका (BMC) आणि राज्य सरकार या दोघांनीही मिळून मुंबईच्या विकासासाठी खूप कार्य केले. मात्र, अजूनही महागाई, बेरोजगारी आणि जाती, धर्म, पंथ यांच्यातील द्वेषासारखे प्रश्न आपल्यासमोर आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.