राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज (17 फेब्रुवारी ) निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
राज्यपालांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात राजभवनात अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. तसेच राजभवनातील विस्तारित इमारतीचे बांधकाम करण्यात आले.
श्री गणेशाची प्रतिमा भेट देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले.
याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांना स्वतः उपस्थित राहिलेले राज्यपाल अशीही त्यांची ओळख महाराष्ट्राला कायमच लक्षात राहील.