आज मुंडेसाहेब असते तर 50-50 चा फॉर्म्युला झाला असता ! 

आज मुंडेसाहेब असते तर 50-50 चा फॉर्म्युला झाला असता ! 

नगर ः ""आज मुंडेसाहेब असते तर निश्‍चित 50-50 चा फॉर्म्युला तयार झाला असता, अन जनतेच्या कौलाचा सन्मान केला असता,"" अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सरकारचा झालेला तिढा सोडविण्याची धमक दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्यात होती, असे मत व्यक्त करीत नेटिझन्सला मुंडे यांची आठवण झाली आहे. 

गोपिनाथ मुंडे यांनी भाजपला वारंवार अनेक संकटातून बाहेर काढले. महाराष्ट्रात भाजपला नवा चेहरा निर्माण करून दिला. त्यांच्यानंतर त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी हा वारसा जपला. मात्र पंकजा मुंडे यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी मोठ्या मनाने जनतेचा कौल स्विकारून पराभव झाला असला, तरी खचून गेले नाही, जनतेची कामे करीतच राहणार असे जाहीर केले होते. 

आता सत्ता स्थापना करताना मोठा पेच निर्माण झाला आहे. जास्त जागा मिळूनही भाजप अखेर सत्ता स्थापना करण्यास असमर्थ झाला. शिवसेनेने वेगळा घरोबा करीत युती तोडली. अशा कठिण परिस्थितीत गोपिनाथ मुंडे असते, तर त्यांनी नक्कीच शिवसेनेला सोबत घेवून तोडगा काढला असता. सत्तेत भाजप सरकार असते, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया नेटिझन्सकडून व्यक्त करीत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com