किमान समान कार्यक्रम ठरवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ : उद्धव ठाकरे 

किमान समान कार्यक्रम ठरवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊ : उद्धव ठाकरे 

मुंबई : आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवू आणि नंतर पुढे जाऊ असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की हिंदुत्व वचनबद्धता कलम आहे. आमच्या मित्राने (भाजप) शुभेच्छा दिल्या आहेत. चांगली गोष्ट आहे. हे सगळे असले तरी आमची दोन्ही कॉंग्रेसशी बोलणी सुरू आहे. राज्याचे राजकारण वेगळ्या दिशेने जात असेल तर ते होईल अशी माहिती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. 

मुंबईत शिवसेना आमदारांशी चर्चा केल्यानंतर ठाकरे पत्रकारांना सामोरे गेले. राजकारणात जे होईल ते तुमच्यापुढे येईल. जर दुरूस्त व्हायचे असेल तर बिघडायचे कशाला ? असा सवाल करीत ठाकरे म्हणाले, की महायुती म्हणून लढण्यापूर्वी आमचे भाजपबरोबर जे ठरले होते ते घडले नाही. मला खोटे पाडण्याचा प्रयत्न भाजपने केला. अडीच वर्षाचे जे ठरले होते त्याबाबत शब्द बदलला. त्यामुळेच मी भाजपला विरोध केला. सत्तेसाठी मला लालूच दाखविली म्हणून मी त्यांच्या नादी लागलो असे नाही. 

अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे ही भूमिका शिवसेनेची होती. देशात रामराज्य असेल तर दिलेले वचनही पाळायला हवे होते असे सांगत ठाकरे यांनी भाजपबरोबर न जाता कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या बाजूनेच जाण्याबाबत बोलणी सुरू असल्याचे स्पष्ट केले. राज्यपालांना आम्ही 48 तासाची मागणी केली होती मात्र त्यांनी आम्हाला सहा महिन्याची वेळ देतो असे सांगितले. राज्यपाल खूपच दयावान आहेत. अशी व्यक्ती आतापर्यंत लाभला नाही. असे राज्यपाल प्रत्येक राज्याला मिळाले तर कल्याण होईल असे ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com