भाजपचा हा नेता म्हणाला,``फडणवीस दिल्लीत जाणे महाराष्ट्राच्या हिताचे!``

eknath khadase about devendra fadnavis
eknath khadase about devendra fadnavis

जळगाव : देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची राजकीय वर्तूळात सध्या चर्चा
सुरू आहे. यावर माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना जर केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले तर आनंद होईल. त्यापेक्षा महाराष्ट्राला त्यांचा चांगला उपयोग होईल, असे मत खडसेंनी व्यक्त केले.

सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वारे असून तेथे भाजपच्या प्रचारात भाजपचे सर्वच नेते आहे. निवडणूक झाली की केंद्रीय मंत्रिमंडळात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची सद्य जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या राजकीय हालचालीवर श्री. खडसे बोलतांना म्हणाले, की आपले सहकारी केंद्रात जात असतील तर त्याचा आनंद असून दिल्लीत त्यांचे स्वागत आहे. दिल्लीने एकदा सांगितले की मार्ग सुकर होतो. पक्षाने दिलेला आदेश अंतिम असतो, असे ते म्हणाले.

तर...महाराष्ट्रात पुन्हा एकत्र
महाराष्ट्रात शिवसेना सोबत देवेंद्र फडणवीस यांचे संबंध ताणले गेल्याने भाजप सत्तेपासून दूर राहिले. त्यामुळे केंद्रात फडणवीस गेल्यास महाराष्ट्रात पून्हा भाजप-शिवसेना संबंध सुधारू शकतात असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच भाजपच्या गोटात देखील याबाबत हालचाली सुरू आहे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com