पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल मी अधिक माहिती घेऊन अभ्यास केला. त्यामुळेच सावरकरांबद्दलचे माझे यांचे विचार बदलले असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
काल कै. सावरकर यांची पुण्यतिथी होती. त्या पार्श्वभूमीवर भाजपने सावरकर यांचा गौरव करण्याचा प्रस्ताव सरकारने संमत करावा, अशी मागणी केली होती. त्याला शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी उत्तर देताना आधी आमदार नितेश राणेंचे सावरकरांबद्दल मत विचारात घ्या, असा टोला लगावला होता.
त्याला उत्तर देताना राणे यांनी राणे यांनी सावरकर यांचे देशासाठी मोठं योगदान आहे. मी भाजप मध्ये आलो म्हणून माझे त्यांच्याबद्दलचे विचार बदलले नसून मी या विषयाचा अभ्यास केला आणि काही गोष्टी समजून घेतल्या, म्हणून मला त्यांचे महत्व लक्षात आले. आणि म्हणूनच माझा सावरकरांबद्दलचा आदर वाढला, असे प्रत्युत्तर राणे यांनी दिले.
माणसाचे विचार काळानुसार बदलत असतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेसला शिव्या घालत होते. पण आज शिवसेना काँग्रेस सोबत आहे, असाही टोला नितेश राणेंनी लगावला. राजकारणात हे चालत असते असेही ते म्हणाले.
नितेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी सावरकरांबद्दल आक्रमक भाषा वापरली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्व प्राप्त होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.