नाशिक : शिवसेना, भाजप युतीमध्ये आम्हाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे खुप नाराज आहे. पण काय करणार? युतीतच रहावे लागेल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. निवडणुकीनंतर फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असेही ते म्हणाले.
आठवले यांची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले, विधानसभा निवडणूक यंदा विरोधकांना खुप अवघड आहे. युती मध्ये आम्हाला दहा जागा अपेक्षित होत्या. मात्र, त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी नाराज आहे. मात्र दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शिवसेना, भाजप युती सोबतच रहावे लागेल.''
ते पुढे म्हणाले, आमच्या पक्षाचे चिन्ह कॉम्पुटर आहे. मात्र अल्प वेळेत वेळेत ते मतदारांसमोर पोचणे शक्य नसल्याने कमळ चिन्ह घेतले. मुख्यमंत्र्यांनी निवडणून येणाऱ्यांना आरपीआय मान्यतेची तयारी दर्शवली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत भाजपला एकनाथ खडसे यांनी बहुजन चेहरा मिळवून दिला. खडसेना राज्यपाल सारखे पद मिळू शकते. त्यामुळे त्यांनी नाराजी काढावी.'' राज्यात युतीला 240 ते 250 जागा मिळतील असा दावाही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे होतील, शिवसेनेला अधिक जागा मिळाल्यास शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकेल. मात्र भाजप च्या अधिक जागा येतील, असाही दावा त्यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.