मी आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग, रावसाहेबांच्या रसदीची गरज नाही : हर्षवर्धन जाधव 

निवडणूक लढवायला मी समर्थ होतो, आर्थिकदृष्ट्या मी स्वतः सक्षम आहे, त्यामुळे मला रावसाहेबांच्या रसदीची गरज नाही. खैरेंकडून केले जाणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत, असा दावा माजी आमदार व औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. खैरेंचे वयाप्रमाणे तोल जातो, त्यांनी तपासणी करून घ्यावी, असा टोला देखील त्यांनी लगावला.
मी आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग, रावसाहेबांच्या रसदीची गरज नाही : हर्षवर्धन जाधव 

औरंगाबाद : निवडणूक लढवायला मी समर्थ होतो, आर्थिकदृष्ट्या मी स्वतः सक्षम आहे, त्यामुळे मला रावसाहेबांच्या रसदीची गरज नाही. खैरेंकडून केले जाणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत, असा दावा माजी आमदार व औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. खैरेंचे वयाप्रमाणे तोल जातो, त्यांनी तपासणी करून घ्यावी, असा टोला देखील त्यांनी लगावला. 

युती असतांना रावसाहेब दानवे यांनी युतीधर्म न पाळता जावई धर्म पाळत हर्षवर्धन जाधव यांना निवडणुकीत नुसती मदतच केली नाही, तर आर्थिक रसद देखील पुरवली असा आरोप शिवसेनेचे खासदार व लोकसभा निवडणुकीतील उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी नुकताच केला होता. यावरून खैरे-जाधव यांच्यात कलगितुरा रंगला आहे.  रावसाहेब दानवे यांनी निवडणुक काळात जावयाला रसद पुरवली, त्यातील पन्नास लाख रुपये पकडले गेले होते, असा दावा खैरेंनी केला होता. यावर हर्षवर्धन जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना खैरेंचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. 

एकीकडे रावसाहेब दानवेंनी जावई धर्म पाळल्याचे खैरे सांगतात, तर दुसरीकडे आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, दिनेश परदेशी यांनी माझे काम केल्याचे ते म्हणतात. ही सगळी रावसाहेबांची माणस आहेत, त्यामुळे आपला निवडणुकीत पराभव होणार हे दिसू लागल्यामुळे खैरे तोल कुठे तरी जात आहे, त्यांनी आपली तपासणी करून घ्यावी, असा सल्ला देखील हर्षवर्धन जाधव यांनी दिला.  निवडणूक काळात दानवेंनी मला रसद पुरवली आणि माझे पन्नास लाख पकडले गेले, असा दावा जर खैरे करत असतील तर त्यांनी पुराव्यासह हे सिध्द करून दाखवावे, असे आव्हान देतांनाच खैरे माझी एवढी दखल घेत आहेत, यातच माझा विजय असल्याचे जाधव म्हणाले. 

मी आधी रायभान जाधव यांना मुलगा....रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून माझा वारंवार उल्लेख केला जातो, पण आधी मी रायभान जाधव यांच्या सारख्या महाराष्ट्रातील एक मोठ्या व्यक्तीमत्वाचा मुलगा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. दानवेंचा जावई मी नंतर झालो. खैरेंनी जे काही रिपोर्ट घेतले आहेत, त्यातून आपण निवडणुकीत पडलो आहोत, हे त्यांच्या लक्षात आले आहे. पण ते माझ्यामुळे नाही, तर आपल्या कार्यशून्यतेमुळे पडतील. कारण वीस वर्षात त्यांनी काहीच केले नाही, त्यामुळे औरंगाबादची जनताच त्यांचा पराभव करणार आहेत. मग आता त्याच खापर कुणाच्या तरी माथी फोडायचे म्हणून ते मला टार्गेट करतायेत, असा आरोपही हर्षवर्धन जाधव यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com