हाळवणकर यांना निमंत्रण दिले होते पण ते आलेच  नाहीत : हसन मुश्रीफ 

कर्जमाफीची लिंक कॅंडिक्रशवर दिली म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार आयुक्तांना निलंबित केले. यावरून सरकार शेतकऱ्यांबाबत किती गांभीर्याने विचार करते हे लक्षात घ्यावा, असेही श्री मुश्रीफ यांनी सांगितले.
hasan-mushrif-
hasan-mushrif-

कोल्हापूर  : भाजपने शेतकरी सन्मान योजनेचा बट्ट्याबोळ केला होता. सत्तेत असताना दोन वर्षांत कर्जमाफी योजना राबवता आली नाही, तेच आता आमच्याकडून दोन महिन्यात कर्जमाफीची अपेक्षा करत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी शेतकऱ्यांना कशाप्रकारे चिंतामुक्त करणार आहे, हे सांगण्यासाठी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना चर्चेला बोलावले होते; पण ते आले नसल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितेल. दरम्यान, भाजपने मंगळवारी (ता. 28) काढला जाणारा मोर्चा रद्द करावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.


ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी कशापद्धतीने दिली जाणार याची चर्चा करण्यासाठी माजी आमदार हाळवणकर यांना बोलावले होते; पण ते येतो म्हणूनही आले नाहीत. 2019 महात्मा फुले सन्मान योजना जाहीर केली. "


मुश्रीफ पुढे म्हणाले , "राज्यात नियमित आणि प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी व्हावी अशी मागणी केली आहे. यापैकी 50 हजार रुपये जरी मान्य झाले तरीही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यासाठी उपसमिती नियुक्त केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1200 कोटी मिळणार आहेत. "


मुश्रीफ पुढे म्हणाले ,  "या कर्जमाफी खावटी, मध्यम-मुदत, पाणी पुरवठ्याचे कर्जाचा समावेश व्हावा, अशी अनेक मागण्या आहेत. या सर्व मागण्या उपसमितीसमोर देणार आहे. शेतकऱ्यांना जास्ती-जास्त लाभ कसा मिळवून देता येईल, याची काळजी केली जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे दिलेले वचन पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.''


शेतकऱ्यांना लवकरात लवकर एप्रिल ते मेपर्यंत कर्जमाफीची योजना पूर्णत्वास येईल, या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत.या वेळी, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री राजेंद्र यड्रावकर उपस्थित होते.

कर्जमाफी कशी होणार, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने नियोजन केले आहे. यासाठी उपसमितीची नियुक्ती केली आहे. याची सर्व माहिती व नियोजन भाजपच्या नेत्यांना देऊ शकतो. त्यांनी आज चर्चेला यावे असे निमंत्रण दिले होते. मात्र ते आले नाहीत. तरीही त्यांना मंगळवारी (ता. 28) ला मोर्चा काढायचा असेल तर त्यांनी त्यांची सवय जरूर पूर्ण करून घ्यावी, असाही टोला मुश्रीफ यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com