हर्षवर्धन पाटील, विजयदादा फडणविसांची साथ सोडणार नाहीत...

काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीतीले हे दोन दिग्गज नेते पुन्हा मूळ पक्षात जाण्यास तयार नाहीत...
harshwardhan patil, vijaydada will not leave fadnavis
harshwardhan patil, vijaydada will not leave fadnavis

इंदापूर : राज्यात 19 वर्षे मंत्रिमंडळात काम केलेले माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या क्षमतेचा आणि अनुभवाचा भाजप राज्यभर उपयोग करेल, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांनी इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांशी हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री बंगल्याच्या प्रांगणात सुसंवाद साधला.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , माजी मंत्री सुभाष देशमुख, माजी राज्यमंत्री बाळ भेगडे, आमदार राम सातपुते, राहुल कुल, आमदार सचिन कल्याणशेट्टी, बाळासाहेब गावडे आदी उपस्थित होते.

भाजपचे सरकार जाऊन तेथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस या तीन पक्षांचे सरकार आल्याने मेगाभरतीत भाजपमध्ये गेलेले अनेक नेते परतीच्या वाटेवर आहेत की काय, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र फडणवीस यांनी हर्षवर्धन यांच्यासाठीची ग्वाही घेतल्याने ते भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच मोहिते पाटील यांनीही फडणवीस यांची साथ न सोडण्याचा निर्धार केल्याचे कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून दिसून आले.

फडणवीस म्हणाले की हर्षवर्धन प्रचंड लढत दिली असून त्यांच्यापाठीशी मोठा अनुभव आहे. असा नेता आमच्यासोबत आल्याने त्यांच्या नेतृत्वाचा, अनुभवाचा पश्चिम महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रात पक्ष निश्चित उपयोग करून घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी महाराष्ट्र भाजपमय करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  राज्याच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात भाजपने 70 टक्के जागा जिंकून सुद्धा मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केल्याने आपले सरकार सत्तेत आले नाही. 40 टक्के मार्क घेणारे तीन पक्ष एकत्र येऊन मेरिटमध्ये सरकार स्थापन केले असे म्हणतात मात्र हे सरकार फार काळ टिकणार नाही. भाजपास फार काळ सत्तेपासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, ``इंदापूर तालुका हा स्वाभिमानी तालुका असून सन 1952 पासून या तालुक्याने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. दि. 11 सप्टेंबर 2019 रोजी जनतेच्या हितास सर्वोच्च प्राधान्य देवून जनतेच्या आग्रहास्तव भाजपात प्रवेश केला. इंदापूर विधानसभा निवडणुकीतपक्षास 1 लाख 12 हजार विक्रमी मतदान कमळ चिन्हावर झाले. राज्यातील राजकीय परिस्थितीमुळे  आपले सरकार स्थापन होऊ शकले नाही. मात्र यामध्ये आमचा तालुका कमी पडला याचे शल्य आम्हाला वाटते. कदाचित पाच ते दहा तालुक्यात आपले आमदार निवडून आले असते तर राज्यात आपलीच सत्ता आली असती.

तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे यांनी स्वागत केले.  सूत्रसंचालन कैलास कदम तर आभार प्रदर्शन माऊली वाघमोडे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com