अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा  हर्षवर्धन पाटलांना आनंद !

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्य उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे .
Pawar Patil
Pawar Patil

वालचंदनगर :  महाराष्ट्राचे नव्याने झालेले मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिनंदन करुन राज्याला मजबूत व स्थिर मिळाले सरकार मिळाले असून जनतेचे प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचा अशा विश्‍वास  व्यक्त केला.


यावेळी पाटील यांनी सांगितले की,विधानसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपने महाराष्ट्राचे नेतृत्व करावे असा कौल दिला होता. तसेच महायुतीला १७० पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या.महायुतीने सरकार स्थापन करणे गरजेचे होते.भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार  स्थापन व्हावे अशी जनतेची अपेक्षा होती. आज देवेंद्र फडणवीस  यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा आनंद झाला आहे. 


आज शेतकरी अडचणीमध्ये असून प्रशासकीय यंत्रणा ठप्प झाली आहे. एकाला बाजुला अवकाळी पाउस व दुसऱ्या बाजुला शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून शेतकरी हवालदील झाला आहे. शहरातील बरेच प्रश्‍न प्रलंबित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचे ही पाटील अभिनंदन करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेला मजबूत सरकार मिळाले असून जनतेचे  प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com