औरंगाबाद : भाजप सत्तेत असताना जे इतर पक्षातून सत्तेत काही मिळवण्यासाठी आले होते ते आता सत्ता नसल्याने परत गेले. हे सत्तेचे भिक्षुक आहेत जिथे सत्ता मिळेल तिथं जातात, अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी किशनचंद तनवाणी यांच्या प्रवेशानंतर दिली.
भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह नगरसेवक गजानन बारवाल व भाजप शहर उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी बुधवारी (ता.१९)मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तनवानी यांच्या जाण्याने भाजप वर परिणाम होईल असे बोलले जात आहे. मात्र किशनचंद तनवाणी यांच्या जाण्याने भाजपवर काहीही परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया हरिभाऊ बागडे यांनी दिली.
हरिभाऊ बागडे म्हणाले की, भाजपची सत्ता असताना ते आमच्याकडे आले पदी उपभोगली त्यात त्यांची चूक नाही तर त्यांना पदी देणाऱ्यांची आम्ही चूक मानतो म्हणजे ती चूक आमची होती. तिकडे सत्ता तिकडे जाणारे हे भिक्षुक असल्याचे आरोप हरिभाऊ बागडे यांनी केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपवर काही परिणाम होणार नाही, ह्यात जी पक्षात आले होते तेवढेच लोक बाहेर जाणार व आता आगामी निवडणुकीत आणखी कोणी दुसर्या पक्षात जाणार नसल्याचेही हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.