मोदींनी पाच एप्रिल रोजीच दिवे लावण्याचा कायर्क्रम का ठेवला? : हरी नरकेंनी सांगितले कारण

६ एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला शेठना हा दिपोत्सव करायचा आहे,`असे कारण नरके यांनी मांडले आहे.
hari narke
hari narke

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी म्हणून रविवारी (ता. 5 एप्रिल) रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी विजेवरील दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या लावण्याचे आवाहन केेले आहे.

या आवाहनावरून राजकीय साठमारी सुरू झाली आहे. काहींनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करत मोदींची ही योजना वीज वितरण क्षेत्रावर आघात करणारी ठरू शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. भाजपच्या नेत्यांनी या सर्व शंका मोडीत काढल्या आहेत.

ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. हरी नरके मोदी यांनी पाच एप्रिल हाच दिवस दिवे लावण्यासाठी का निवडला, याचे कारण शोधले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार `दिवे लावण्याला तुमचा विरोध का असा प्रश्न विचारला जातोय. आमचा विरोध दिव्याला नाही. ते तर आम्ही दररोज सूर्य मावळल्यापासूनच लावतो. रात्री ९ वाजता घरातले दिवे विझवण्याला आमचा विरोध आहे. ६ एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्याच्या पूर्वसंध्येला शेठना हा दिपोत्सव करायचा आहे,`असे कारण नरके यांनी मांडले आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जागतिक संकट काळातही ज्यांना पक्षीय राजकारण सुचते त्यांच्या काळ्या मानसिकतेला आमचा विरोध आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराज किंवा महात्मा गांधींशी करण्यात येत आहे. त्यावरही नरके यांनी टोकदार टीका केली आहे. गुलटेकडी आणि हिमालय यांची तुलना करता येते का, असा प्रश्न त्यांनी यावर विचारला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com