गारपिटीचा तडाखा; शेतकरी ढसाढसा रडला

शेतकरी जगला तरच समाजातला घटक टिकू शकतो. या आपत्तीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा आंदोलनाचे हत्यार उगारण्यात येईल.रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मंगळवारी लावलेल्या हजेरीने झालेल्या नुकसानीची पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली.
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मंगळवारी लावलेल्या हजेरीने झालेल्या नुकसानीची पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली.

अकोला ः आधीच आर्थिक अडचणींचा डोंगर कमी होईना, त्यातल्या त्यात ही नैसर्गिक आपत्ती काही सुचू देईना असली गत शेतकऱ्यांची झाली आहे. आता रब्बीकडून आशा असताना मंगळवारी (ता.17) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाचे घास हिरावले आहे. 

या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांसमोर पिकाची झालेली नासाडी पाहून शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटला.

वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यात मंगळवारी (ता.17) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी या अवकाळीने कर्जाच्या खायीत लोटल्या गेला आहे. सोयाबीन व कापसाचा हंगाम पावसामुळे वाया गेला. आता रब्बीकडून आशा असताना या अवकाळीने गहू व मका पिकाचे नुकसान केले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मोताळा (जि.बुलडाणा) तालुक्यातील जनुना, धामणगाव, कोथळी, परडा, शिरवा, डिडोळा, बोरखेड, तरोडा, जयपूर या भागात जावून नुकसानीची पाहणी केली. या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मका व गहू पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये जनुना येथील शेतकरी दीड एकरातील सुभाष पंढरीनाथ मानकर यांच्या शेतातील संपूर्ण मका पीक उद्‍ध्वस्त झाले. या शेतकऱ्याच्या शेतात शेतात रविकांत तुपकर हे पाहणीकरिता गेले असता शेतकरी मानकर यांचा तुपकरांसमोर अश्रूंचा बांध फुटला. यावेळी तुपकरांनी शेतकऱ्यास धीर देत मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले. 

शेतकऱ्याची व्यथा ऐकून जिल्हाधिकारी यांच्याशी रविकांत तुपकरांनी फोन वरून चर्चा केली. तो व्हिडीओ त्यांना पाठवला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची गंभीरता लक्षात आणून दिली. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठविले.

सरकारचे काम हे आपत्तीच्या काळात मदत करणे आहे. दर दोन-तीन वर्षांनी अशी नैसर्गिक आपत्ती येत असते. याकरिता सरकारने शेतकऱ्यांसाठी फंड राखून ठेवला पाहिजे. इतर उद्योगांना कर्ज माफ होतात. सबसिडीच्या स्वरुपात मदत करते. शेतकरी जेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे कोलमडल्या जातो, तेव्हा मात्र सरकार त्यांना मदत करायला धजावत नाही. शेतकरी जगला तरच समाजातला घटक टिकू शकतो. या आपत्तीच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अन्यथा आंदोलनाचे हत्यार उगारण्यात येईल.
- रविकांत तुपकर, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com