#Coronaeffect ग्रामपंचायत निवडणुका अर्थात नेतृत्वाच्या शाळेलाही लागले टाळे

ग्रामपंचायत निवडणूका म्हणजे नेतृत्वाची प्राथमिक शाळा. विधानसभा, लोकसभेच्या निवडमूका सोप्या. मात्र गल्ली व भावकीतील मतदारांच्या ग्रामपंयात निवडणूका अवघड. या अवघड निवडणूकांचे अर्ज दाखलकरुन गल्लो-गल्ली पार्ट्या अन्‌ राजकारणाचे फड रंगात येतच होते. मात्र कोरोनामुळे राज्य सरकारने राज्यातील दीड हजाराहून अधिक निवडणूका स्थगित केल्या
Grampanchayat Election Stayed in Maharashtra
Grampanchayat Election Stayed in Maharashtra

नाशिक : ग्रामपंचायत निवडणूका म्हणजे नेतृत्वाची प्राथमिक शाळा. विधानसभा, लोकसभेच्या निवडमूका सोप्या. मात्र गल्ली व भावकीतील मतदारांच्या ग्रामपंयात निवडणूका अवघड. या अवघड निवडणूकांचे अर्ज दाखल करुन गल्लो-गल्ली पार्ट्या अन्‌ राजकारणाचे फड रंगात येतच होते. मात्र कोरोनामुळे राज्य सरकारने राज्यातील दीड हजाराहून अधिक निवडणूका स्थगित केल्या. त्यामुळे राजकारणाच्या प्राथमिक शाळेलाही टाळे लागले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील १०२, तर येवला तालुक्‍यातील २५ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका स्थगित केल्या आहेत. आता छाननी, माघार, मतदान व मतमोजणी कोरोनो थंड झाल्यावर घेण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे गावोगावी तापलेले वातावरण थंडावले आहे. राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार निवडणूक आयुक्तांनी मंगळवारी (ता.१७) याबाबत परिपत्रक जारी केले. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांशी संबंधित प्रभागरचना, मतदारयादी व प्रत्यक्ष निवडणूक आदी सर्व कार्यक्रम आहे, त्या टप्प्यावर स्थगित केले आहेत.

राज्यातील १९ जिल्ह्यांतील एक हजार ५७०  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १०२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात कळवणमधील २९, येवल्यातील २५, इगतपुरीच्या चार व दिंडोरीच्या ४४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी नव्या कार्यक्रमानुसार मंगळवारी (ता. १७) अर्जांची छाननी, तर गुरुवारी (ता.१९) दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेता येणार होते. ३१ मार्चला मतदान व १ एप्रिलला मतमोजणी होणार होती. 

पण या सर्व कार्यक्रमांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही संदर्भात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर स्वतंत्र आदेश देण्यात येतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे गावोगावी होणाऱ्या बैठका, चर्चा, प्रचारसभांना होणारी गर्दी आपसूकच टळणार आहे. मात्र, अर्ज दाखल झाल्याने मोठा कालावधी मिळणार असून, माघारी व फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्‍यता आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार आहे त्या स्थितीत निवडणूक प्रक्रिया थांबली आहे. पुढील आदेशानंतरच प्रक्रिया सुरू होईल. निवडणुका असलेल्या गावांसह सर्व तालुक्‍यांत नागरिकांनी गर्दी करू नये व शासनाच्या आदेशाचे पालन करावे - रोहिदास वारुळे, तहसीलदार, येवला
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com