गिरीश महाजन कोल्हापूरच्या दौऱ्यावर

गिरीश महाजन कोल्हापूरच्या दौऱ्यावर

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावर सात ऑगस्ट बुधवार दुपारी बारा वाजता 74 हजार 621 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. यामध्ये केवळ धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग हा 17400 आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापूर दौऱ्यावर येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील पूर स्थिती पूर्णपणे मंत्रालयातून नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे. वारणेत सोडण्यात आलेला विसर्ग हा 30 हजार 134 आहे. राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी यातून पंचगंगा नदीमध्ये साधारण एकवीस हजार चारशे इतका विसर्ग होत आहे. दूध गंगेचा विसर्ग 21 हजार असून तो कर्नाटक कडे जात असल्यामुळे त्याचा परिणाम कोल्हापुरातील पंचगंगा नदीवर होत नाही.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.  पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी  त्यांनी प्रशासनाकडून आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाकडून याबाबतचे नियोजन सुरू झाले आहे. पूर परिस्थिती 1989 आणि 2005 पेक्षा भयंकर असल्यामुळे कोल्हापुरातील पूर स्थिती बाबत थेट राज्य सरकारने मंत्रालयातून सर्व सूत्रे हलवण्याचे काम सुरू केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com