गिरीश महाजन निकालानंतर प्रतिक्रियाही न देता थेट मुंबईत!

महाजन यांनीच युती 220 च्या जागा पार करणार असल्याचा नारा सर्वाधिक दिला होता.
गिरीश महाजन निकालानंतर प्रतिक्रियाही न देता थेट मुंबईत!

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे "संकटमोचक'म्हटले जाणारे नेते गिरीश महाजन हे विधानसभा निकालानंतर कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त न करता जामनेर थेट मुंबईत दाखल झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदार संघातून गिरीश महाजन तब्बल 35 हजार 14 मतांनी विजयी झाले. त्यांना 1लाख 14हजार 714 मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय गरूड यांना79 हजार 700 मते मिळाली. त्यांचा या मतदार संघातून तब्बल सहाव्यांदा विजय झाला आहे. निकालानंतर जामनेर येथे त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळीही ट्रकवरून थेट नागरिकात उडी घेवून सर्वांना आश्‍चर्यंचकित केले. मिरवणूक संपल्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता दुपारी ते जामनेर येथे थेट मुंबईला रवाना झाले.

युतीतील "संकटमोचन"करणार?

गिरीश महाजन हे नेहमी भारतीय जनता पक्षाला अडचणीतून बाहेर काढत असतात. त्यामुळेच त्यांना पक्षाचे संकटमोचक म्हटले जात असते. राज्यात भाजप व शिवसेना युतीला बहुमत मिळाले आहे. मात्र आता शिवसेनेवर भाजपने पंजा उगारला असून सत्तेत समान वाटा मागितला आहे. त्यामुळे आता अडचण निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत भाजपचीही चिंता वाढली आहे. गिरीश महाजन आता कोणते "संकटमोचन'करणार याकडेच आता लक्ष आहे. महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांचा पराभव झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com