माझ्या वाटेला जाणाऱ्यांना सोडणार नाही, गणेश नाईकांचा इशारा 

माझ्या वाटेला जाणाऱ्यांना सोडणार नाही, गणेश नाईकांचा इशारा 

नवी मुंबई : "" मी कधीच कोणत्या पक्षावर अथवा त्यांच्या नेत्यांवर टीका केली नाही, किंबहुना मला ते आवडतही नाही. परंतु जे कोणी माझे नाव घेतील, त्यांना सोडणार नाही. अशा शब्दात भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना नाव न घेता दिला आहे. 

नेरूळ येथील करावे गावातील "विरंगुळा' केंद्राच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.. गेल्या आठवड्यात नवी मुंबईत पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पालिका निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नाईकांवर अप्रत्यक्ष टीका केली. या टीकेला नाईकांनी आज चोख उत्तर दिले. 

नवी मुंबईच्या विकासावर टीका करणाऱ्यांनी पहिले आपले शहर स्वच्छ करावे. नंतर नवी मुंबईत येऊन टीका करावी. असा टोला नाईकांनी आघाडीच्या नेत्यांना लगावला. पालिका परीवहन सेवेत 31 रूपये प्रति किलोमीटरने एनएमएमटीच्या बसेस चालवल्या जातात. मात्र, इतर ठिकाणी 51 रूपये चालवल्या जातात. मग हा फरक कोणाच्या घशात घातला जातो. असा सवालही नाईकांनी उपस्थित केला. 

निवडणूकीपूर्वी काही लोक आग लावण्याचे धंदे करणार आहेत. अशा आग लावणाऱ्या लोकांपासून सावध रहा. गणेश नाईक ज्यांना उमेदवारी देईल त्याला निवडून आणणारच. या गावचे व तसेच शहराचे भले करेन असेही नाईक यावेळी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com